काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ला ‘पोलखोल’ यात्रेने उत्तर देणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा येत्या २१ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या महाजनादेश यात्रेला कॉंग्रेस चे नाना पटोले पोलखोल यात्रेतून उत्तर देणार आहेत. मुख्यमंतत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी भाषणे केली, विकासाचे मुद्दे मांडले त्या मुद्द्याची पटोले पोलखोल करणार आहेत. येत्या २० ऑगस्टपासून पटोलेंची पोलखोल यात्रा सुरु होणार आहे.

राज्याच्या झालेल्या विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधकांना आव्हान केले होते. पटोलेंनी हे आव्हान स्विकारले आहे. या यात्रेत ते मुख्यमंत्र्यांची पोलखोल करणार आहेत. फडणवीसांनी ज्या मोजरीतून महाजनादेश यात्रेला सुरवात केली होती त्या मोजरीपासूनच पटोलेही त्याच्या पोलखोल यात्रेला सुरवात करणार आहेत.

मुख्यंत्र्यांनी भाषणात केलेले विकासाचे दावे किती खोटे आहेत यासाठी ही पोलखेल यात्रा असेल. मुख्यमंत्री ज्या ठिकाणी भाषणे करतील त्यातील मुद्द्याची पडताळणी पटोले करणार आहेत. मुख्यमंत्र्यानी त्याच्या भाषणात मांडलेली आकडेवारी, घोषणा यांची प्रत्यक्षात झालेली कामे आणि सरकारी आकडेवारी ते जनतेसमोर मांडतील.

आरोग्यविषयक वृत्त –