महिन्याला 10 हजार रूपयांच्या गुंतवणुकीनंतर मिळतील तब्बल 16 लाख, पोस्टाची ‘ही’ योजना म्हणजे बँकेच्या FD पेक्षा बेस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्हाला रिटर्न चांगला हवा आहे.. तर पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) योजनेत गुंतवणूक करा. तुम्हाला ते अधिक फायदा देतील. यात कोणत्याही प्रकारची जोखीम नाही. शिवाय सरकारी गॅरंटीच्या स्कीम्स असल्याने ही योजना तुमच्यासाठी अधिक सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांपैकी या दोन योजना पाहू. पहिली म्हणजे सेव्हिंग स्कीममध्ये (Small Saving Scheme). या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये (Small Saving Scheme) तुम्हाला कमीतकमी गुंतवणूक करून रिटर्न चांगला मिळतो. तर दुसरी रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit). रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक परतावा मिळतो. तुम्ही अंत्यत कमी कमी पैशात तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. यात सर्वांत मोठा फायदा म्हणजे तुम्ही फक्त १०० रुपये महिना गुंतवणूक करू शकता. जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला शक्य असेल तेवढ्या पैशात गुंतवणूक करू शकता. ग्राहकांसाठी ही योजना सोयीची आहे कारण पोस्ट ऑफिसचे आरडी डिपॉझिट अकाउंट उत्तम व्याजदर देतं. सरकारी गॅरंटी असल्याने ही योजना ग्राहकांसाठी सोयीची अधिक आहे.

किती मिळेल व्याज?

कमीत कमी 5 वर्षांसाठी आरडी खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जातं. वार्षिक दरानं (प्रत्येक तिमाहीला) जमा रकमेवर व्याज मोजलं जातं. हे व्याज तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये चक्रवाढ व्याजासह (Compound Interest) जोडलं जातं. आताच्या व्याजदरानुसार, जर तुम्ही पोस्टाच्या या योजनेत 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 16.28 लाख रुपये मिळतील.

इंडिया पोस्टच्या वेबसाइटच्या माहितीनुसार

१ जुलै २०२० पासून हा नवा दर लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीला त्यांच्या छोट्या बचत योजनांसाठी व्याज दराची घोषणा करते. आरडी योजनेवर सध्या 5.8 टक्के प्रत्येक तिमाहीला व्याज दिले जात आहे.

RD खात्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे

– जर तुम्ही वेळेत एखादा हप्ता भरला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

– आरडी योजनेत हप्ता भरण्यात उशीर झाल्यास प्रत्येक महिन्याला एक टक्के दंड द्यावा लागेल.

– जर तुम्ही सलग ४ हप्ते भरले नाहीत तर तुमचे खाते बंद होईल.

– मात्र हे खाते बंद झाल्यास 2 महिन्याच्या आतमध्ये ते पुन्हा सक्रीय करता येईल.