नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मोबाईल सेवा अखेर सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्य सचिव रोहित कंसल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आजपासून येथील पोस्टपेड मोबाईल सेवा सुरु करण्यात आली असून इंटरनेट सुविधांसाठी मात्र नागरिकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
Postpaid mobile services restored in the remaining parts of Jammu & Kashmir. Visuals from Srinagar. pic.twitter.com/ncm3NJD1b6
— ANI (@ANI) October 14, 2019
मागील दोन महिन्यांपासून या ठिकाणी फोन आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे देशभरात असलेल्या नातेवाईकांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क साधता येत नव्हता. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच ऑगस्टपासून या ठिकाणी मोबाईल आणि फोनची सेवा बंद ठेवण्यात आली होती. पोस्टपेड सेवा सुरु करण्यात आली असून इंटरनेट आणि प्रीपेड सेवांच्या बाबतीत नंतर निर्णय घेण्यात यावर असल्याची माहिती सचिवांनी दिली आहे.
5 ऑगस्टपासून इंटरनेट बंद
मोबाईल सेवा सुरु करण्यात आली असून अद्याप इंटरनेट सेवांवर कोणतेही भाष्य करण्यात आले नसून 5 ऑगस्टपासून येथील सेवा बंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला केवळ बीएसएनएल पोस्ट-पेड सेवाच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर सर्वच कंपन्यांच्या सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोबाईल फोन सुरु करण्याची मागणी
पर्यटन क्षेत्रात असणाऱ्या स्थानिकांनी मोबाईल सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. मोबाईल सेवा सुरु नसल्याने त्यांना बुकिंग घेता येत नाहीत तसेच ग्राहकांशी देखील त्यांना संपर्क साधता येत नाही. या सेवांबरोबरच ऑगस्टमध्ये देण्यात आलेले आदेश देखील मागे घेण्यात आले असून आता पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाऊ शकतात.
Visit : Policenama.com
- बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी