PM किसान सन्मान निधी स्कीमचे 2000 तुमच्या अकाऊंटमध्ये जमा झाले नाहीत तर ‘नो-टेन्शन’, इथं तक्रार करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठविले आहेत. दरम्यान, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्यास पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकता. केंद्र सरकारने सुरू केलेल्या शेतकर्‍यांशी संबंधित ही सर्वात मोठी योजना आहे आणि प्रत्येक खर्‍या शेतकर्‍याला त्याचा लाभ मिळावा, यासाठी शासनाचा प्रयत्न आहे.

2000 रुपये मिळविण्यासाठी येथे द्यावी लागेल तक्रार, त्वरित केले जाईल निराकरण :
सर्व प्रथम, आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपले म्हणणे ऐकत नाहीत तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता. सोमवार ते शुक्रवार या काळात पंतप्रधान-किसन हेल्प डेस्कवर [email protected] या ईमेल वर संपर्क साधता येईल. तेथून काही फरक पडत नसेल तर या सेलच्या फोन नंबर 011-23381092 वर कॉल करू शकता.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितले की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचले नसतील तर तातडीने त्यांचे समाधान केले जाईल. ते म्हणाले, ‘आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा मिळाला पाहिजे, म्हणूनच सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत वचन दिल्याप्रमाणे या योजनेचा विस्तार केला.’

गेल्या अनेक महिन्यांपासून किसान सन्मान निधी योजनेबाबत तक्रारी येत आहेत. नोंदणीकृत शेतकर्‍यांनाही पैसे मिळत नसल्याची तक्रार येत आहे. तसेच एकाच गावातील काही शेकऱ्यांच्या खात्यात दोन वेळा २-२ हजार रुपये जमा झाले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झालं असून दुसरा हप्ता जमा झाला नाही. अशा लोकांनी प्रथम त्यांचे लेखापाल आणि कृषी अधिकारी यांना विचारावे की त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही. जर यादीत नाव असेल तर मग पैसे का आले नाहीत? आपणास उत्तर न मिळाल्यास योजनेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा. देशातील सर्व 14.5 कोटी शेतकर्‍यांना सरकार पैसे देऊ इच्छित आहे. जर शासनाचा हा हेतू पूर्ण करण्यात एखादा अधिकारी अडथळा ठरत असेल तर त्याची तक्रार करा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/