‘या’ लोकांना मोदी सरकार देणार वर्षाला 36 हजार रूपये, जाणून घ्या कसं करावं ‘रजिस्ट्रेशन’
नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कचरा उचलणारे, घरगुती कामगार, रिक्षा चालक, धोबी आणि शेतमजूर यासारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोदी सरकार प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना (पीएम-एसवायएम) चालवते. या स्कीम अंतर्गत केंद्र सरकार 60 वर्षाच्या वयानंतर वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन देते. सरकारच्या आकड्यांनुसार, देशात असे 42 करोडपेक्षा जास्त वर्कर्स आहेत, ज्यांना या स्कीम अंतर्गत न्याय मिळू शकतो.
64.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी केले रजिस्ट्रेशन
याशिवाय सरकार पीएम किसान मानधन योजना आणि लघु व्यापारी पेन्शन योजना सुद्ध चालवते. 6 मेपर्यंत या स्कीममध्ये सुमारे 64.5 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. या योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे त्याबाबत जाणून घेवूयात.
कोण घेवू शकतात स्कीमचा फायदा
केंद्र सरकारची ही स्कीम असंघटीत क्षेत्रातील लोकांसाठी आहे. या अंतर्गत रजिस्ट्रेशनसाठी वय 18 वर्ष ते 40 वर्षादरम्यान असावे. तसेच मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
असा करा अर्ज
ईपीएफओ इंडियाच्या वेबसाइटवर आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चा शोध घेऊ शकता. येथे रजिस्ट्रेशन होईल. याशिवाय, एलआयसीचे ब्रांच ऑफिस किंवा ईएसआयसी, ईपीएफओ केंद्र आणि राज्य सरकारच्या लेबर ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. काही राज्यांचे कामगार विभाग स्वताच रजिस्ट्रेशन वाढवण्यासाठी अभियान चालवत आहेत.
हे तीन कागदपत्र हवेत
(1) आधार कार्ड
(2) आयएफएससी कोडसह सेव्हिंग किंवा जनधन अकाऊंट
(3) मोबाइल नंबर
कुणाला मिळणार नाही स्कीमचा लाभ ?
संघटीत क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ), नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) किंवा राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ईएसआयसी) चे सदस्य किंवा आयकर भरणारे लोक या स्कीमचा लाभ घेऊ शकत नाहीत.
किती असेल प्रीमियम ?
वयाच्या हिशेबाने प्रीमियम लागेल. जर कुणी 18 वर्षांची व्यक्ती स्कीममध्ये येईल तर त्यास 55 रुपये दरमहिना जमा करावे लागतील. 29 वर्षांच्या व्यक्तीला 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तीला 200 रुपये द्यावे लागतील. हा कमाल प्रीमियम आहे. तुम्हाला ही रक्कम 60 वर्ष वयापर्यंत जाम करावी लागेल. तुम्ही जेवढा प्रीमियम जमा कराल तेवढीच रक्कम सरकारही त्या व्यक्तीच्या नावे जमा करेल.