व्यासपीठावर मागची खुर्ची मिळाल्याने खा. प्रज्ञा ठाकूर संतापल्या, भर कार्यक्रमातून निघून गेल्या

भोपाळ : वृत्तसंस्था – नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणा-या भाजपाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर ( MP Pragya Singh Thakur) यावेळी मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमा दरम्यान त्यांना व्यासपीठावर मागची खुर्ची मिळाल्याने खा. प्रज्ञा सिंह ठाकूर संयोजकांवर संतापल्या अन् कायक्रम अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

भोपाळमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयाचा उदघाटन होते. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा आणि खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर उपस्थित होत्या. पण जेव्हा व्यासपीठावर जाण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला मागच्या रांगेत खुर्ची देण्यात आल्याचे पाहून साध्वी प्रज्ञा नाराज झाल्या. त्यांनी स्थानिक यावेळी स्थानिक नेत्यांना हे बोलून देखील दाखवले. स्थानिक भाजप नेत्यांकडून यावेळी प्रज्ञा सिंह यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला गेला. पण संतापलेल्या साध्वी प्रज्ञा या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराजसिंह येण्याआधीच तिथून निघून गेल्या.

खुर्चीच्या ओढाताणीत आज मीही फसले : खा. प्रज्ञा सिंह
पक्षाचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जाताना साध्वी प्रज्ञा सिंह काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी कोणतेही करणे टाळले. पण त्यानंतर आणखी एका कार्यक्रमात त्यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. कोणतीही गोष्ट अर्धवट बोलणं हे तुमच्या व्यक्तीत्वाला अपूर्ण ठरवते. यापेक्षा जास्त मी काहीच बोलू इच्छित नाही. ज्यांना समजले असेल ते ठीक आहेत. ज्यांना नसेल समजल ते अनाडी आहेत. खुर्चीच्या ओढाताणीत आज मीही फसले आहे. आतापर्यंत या ओढाताणीत मी अडकले नव्हते, असे साध्वी प्रज्ञा भोपाळच्या मानस भवन कार्यक्रमात एका प्रवचना दरम्यान म्हणाल्या.