नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांची स्तुती करणाऱ्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या टिपण्णी पासून भाजप स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच इथं एका आमदारानं म्हटलं की, नथुराम गोडसेनं चूक केली परंतु तो दहशतवादी नव्हता.
‘जे देशाविरोधी कार्यात सहभागी आहेत ते दहशतवादी आहेत’
बलिया जिल्ह्यातील बैरिया विधानसभेचे आमदार सुरेंद्र सिंह गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “गोडसे दहशतवादी नव्हता. जे लोक देशाविरोधी कार्यात सहभागी असतात ते दहशतवादी असतात. गोडसेनं देशभक्त गांधींची हत्या करून चूक केली.” सुरेंद्र सिंह यांनी ‘चूक’ या शब्दासाठी हिंदी शब्द ‘भूल’ वापरला. गोडसे देशभक्त होता का असे विचारल्यानंतर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.
‘प्रज्ञा सिंह ठाकूर संसदेत नथुराम गोडसेंना देशभक्त म्हणाल्या’
भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर संसदेत नथुराम गोडसेंना देशभक्त म्हणाल्या. बुधवारी झालेल्या लोकसभेतील डिबेटमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. लोकसभेत एसपीजी संशोधन बिलावर डीएमके खासदार ए राजा आपलं मत मांडत होते. ज्यात त्यांनी गोडसेच्या मी महात्मा गांधींना का मारलं होतं या विधानाचा उल्लेख केला होता. यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ झाला होता.
Visit : Policenama.com
- नक्की किती तास झोप घ्यावी ? कमी आणि जास्त झोपेचे ‘हे’ आहेत ५ परिणाम
- शरीराच्या सर्व अवयवांचा होतो व्यायाम, द्रोणासनाचे ‘हे’ ३ फायदे
- लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत ७ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- त्वचा सुंदर बनविण्यासाठी ‘या’ ८ टिप्स तुम्हाला पडतील उपयोगी, जाणून घ्या
- कंबर आणि पोटावरील चरबी ‘या’ आसनाने होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे
- मज्जातंतू कार्यक्षम होण्यासाठी करा ‘परिवर्तित चक्रासन’, हे आहेत ५ फायदे