पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे तर हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी कमी-अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरीला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातही तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी कमी-अधिक पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीला 29-30 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सातारा आणि कोल्हापुरात घाट माथ्यावर आज जोरदार पाऊस पडू शकतो. पुण्यात 29 आणि 31 ऑगस्टला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
विदर्भातही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर अशा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर