निर्भया केस : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोषी मुकेश सिंहचा दयेचा अर्ज फेटाळला, आता फाशी निश्चित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया गँगरेप केसमधील आरोपी मुकेश सिंह याची याचिका फेटाळली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं निर्भया केसमधील आरोपींपैकी एकाची याचिका शुक्रवारी रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली होती. आरोपी मुकेश सिंहनं काही दिवसांपूर्वीच दया याचिका दाखल केली होती. मंत्रालयानं ही याचिका अस्विकार करावी अशी शिफारसही करण्यात आली होती. निर्भया गँगरेप आणि मर्डर केसमधील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Ministry of Home Affairs (MHA) Sources: One of the convicts of 2012 Delhi gang rape case, Mukesh's mercy plea has been rejected by President Kovind, MHA has received the communication. pic.twitter.com/uwg3PMudG1
— ANI (@ANI) January 17, 2020
दिल्लीच्या उपराज्यपालांनी गुरुवारी मुकेश सिंह याची दया याचिका गृह मंत्रलयाकडे पाठवली होती. याच्याच एक दिवस आधी दिल्ली सरकारनं ही याचिका अस्विकार करण्यासाठी शफारस केली होती. दिल्ली कोर्टानं 32 वर्षीय मुकेश सिंह, 26 वर्षीय विनय शर्मा, 31 वर्षीय अक्षय कुमार सिंह आणि 25 वर्षीय पवन गुप्ता या चारही आरोपींना मृत्यूची शिक्षा सुनावत 7 जानेवारी रोजी डेथ वॉरंट जारी केलं होतं. त्यावेळी कोर्टानं फाशी देण्यासाठी 22 जानेवारी ही तारीख ठरवली होती.
आज डेथ वॉरंटवर सुनावणी
आप सरकार दिल्ली हायकोर्टाला बुधवारी म्हटलं होतं की, “केसमधील आरोपी मुकेश कुमार सिंह, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना पूर्वनिर्धारीत तारीख 22 जानेवारी रोजी फाशी दिली जाऊ शकत नाही. कारण त्यातील एका आरोपीनं दया याचिका दाखल केली आहे. आणि कारावास नियमावलीनुसार, जोपर्यंत सर्व कायदेशीर पर्याय समाप्त होत नाही तोपर्यंत फाशी दिली जाऊ शकत नाही.”
अशात मुकेश सिंहची याचिका फेटाळण्यात आली आहे. यानंतर आता आज(शुक्रवार दि 17 जानेवारी) डेथ वॉरंटवर सुनावणी होत आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –