मंदिरे खुली करण्याच्या मागणीला जोर, शिर्डीकरांचा उपोषणाचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील अनेक धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी दिली असताना महाराष्ट्रात मात्र अद्यापही मंदिरांना कुलूप आहे. त्यामुळे आता मंदिर उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिर्डीचे साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने अर्थकारण जागेवर थांबले आहे. त्यामुळे साई मंदिर सुरू करण्याची मागणी वाढत असून सरकारने लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढाई सोबत आता उपोषण करावे लागले असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. गेल्या 6 महिन्यात शिर्डीच एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र मागील 5 महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होतोय. मंदिर परिसरात राहणार्‍या अनेकांचे उद्योग आणि व्यवसाय मंदिर बंद असल्याने ठप्प झाले आहेत. राज्यात सर्व काही सुरु होत असताना मंदिर देखील सुरु करण्यात यावी अशी मागणी भाविक करत आहेत. तिरुपती बालाजी मंदिराच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी भाविक करत आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी सनातनी वारकरी संप्रदयासोबत आंदोलनात उतरणार असल्याचा इशारा दिला आहे. कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेने 1 लाख वारकार्‍यांसामावेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत