पंतप्रधानांकडून फडणवीस, दानवे यांचे अभिनंदन

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात वेगवेगळी आंदोलने चालू असतानाही सांगली आणि जळगांव महापालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद बहुमत मिळविल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी कठोर परिश्रम करीत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रशंसा केली आहे.

महापालिका निवडणुका या स्थानिक राजकारणाचा भाग मानल्या जातात. त्यातील जय – पराजय याची दखल पंतप्रधान वा केंद्रीय नेत्यांच्या पातळीवर सहसा घेतली जात नाही .परन्तु राज्यातील सध्याचे वातावरण पाहाता भाजपसाठी जळगांव आणि त्यातही सांगली महापालिकेचा कौल महत्त्वाचा मानला जातो . राज्यात सतत काही ना काही कारणाने आंदोलने चालू आहेत आणि फडणवीस त्याला सामोरे जात आहेत . त्यामुळे सांगलीची निवडणूक ही तर त्यांच्यासाठी परिक्षा होती . त्यात ते जिंकले. यामुळे भाजपत लोकसभाही जिंकू असा विश्वास निर्माण झाला आहे . त्यामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री पियूष गोयल, व्यापार मंत्री सुरेश प्रभू , पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुख्य मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे .
[amazon_link asins=’B00ZR9C9Q2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb2bca41-97a4-11e8-95ce-6165d54a6a38′]