आसाममध्ये आंदोलनकर्त्या तरूणांना केले PM नरेंद्र मोदींनी ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरीकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसाममधील आंदोलनाने तीव्र स्वरुप धारण केले आहे. तेथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. तुमचे मुलभूत अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, मी आसामच्या आपल्या भाऊबहिणींना आश्वस्त करु इच्छितो की नागरिकत्व संशोधन बिल पास झाल्याने कोणीही चिंता करण्याची गरज नाही. मी आपल्याला आश्वासित करु इच्छितो की कोणी त्यांचे अधिकार, आपली वेगळी ओळख आणि खुबसुरत संस्कृती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ती सातत्याने फलती फुलती राहील, अशा शब्दात आसामच्या तरुण तरुणींना आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आहे.

Visit : policenama.com