आपण फोन लावला तर समोरच्याला ऐकायला येत नाही. किंवा समोरच्याचे म्हणणे ऐकायला येत नसणे, बोलणे सुरु असताना फोन कट होणे अशा समस्या आता आपण सरसावलो आहे. पण आता लोकांनी त्यावरुन चीड चीड करायची काही एक गरज नाही. ही समस्या केवळ तुमच्या एकट्याची नाही यावर समाधान माना. कारण आपल्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कॉल ड्रॉपच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. त्यांनी नुकताच दिल्ली विमानतळ ते आपल्या कार्यालयापर्यंतचा प्रवास केला. तसेच मेट्रोमधूनही प्रवास केला होता. त्यावेळी त्यांना फोन करताना कशा प्रकारच्या अडचणी आल्या हे त्यांनी टेलिकॉम विभागाला सांगून यावर तांत्रिक उपाय शोधण्याची सूचना केली आहे. तसेच मोबाइल आॅपरेटर्स ग्राहकांना योग्य सुविधा पुरवत असल्याकडेही लक्ष देण्यास सांगितले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76952021-c21b-11e8-8f40-4d820e4a3d70′]
पती हा पत्नीचा मालक नाही : सुप्रीम कोर्ट
मोबाइल ग्राहकांना सामोरे जावे लागत असणाऱ्या समस्येवर तातडीने उपाय शोधण्याची गरज असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी नरेद्र मोदींनी टेलिकॉम सेक्रेटरींना कॉल ड्रॉपमुळे आतापर्यंत टेलिकॉम आॅपरेटर्सकडून किती दंड गोळा करण्यात आल्यासंबंधी माहिती विचारली. यावेळी सुंदराजन यांनी सांगितलं की, तीन कॉल ड्रॉपमागे एक रुपया दंड आकारण्याचा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने क्वालिटी आॅफ सर्व्हिस प्रस्ताव आणला होता ज्यामध्ये खराब नेटवर्कसाठी जास्त दंड आकरण्याचा प्रस्ताव होता. कारवाईविरोधात मोबाइल आॅपरेटर दंड ठोठावण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथपर्यंत मोबाइल आॅपरेटरर्सकडून दंड वसूल केल्याचा प्रश्न आहे, मंत्रालय ती माहिती देऊ शकलेले नाही.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b70b32f7-c21b-11e8-b353-1bb3c7ac1ab9′]