काल लोकसभेत भाजपावर टीडीपी सोबतच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा मोदी सरकारवर जोरदार टीकेचा प्रहार केला. राहुल गांधींनी मोदी सरकारवर केलेल्या प्रहारावर मोदी सरकारने जोरदार फटकेबाजी केली. इतकेच नव्हे तर झालेल्या गळाभेटीवर राहुल गांधींची फिरकीही घेतली.या बाबत अधिक माहिती अशी की, काल लोकसभेत भाजपावर टीडीपीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावात टीडीपी बरोबरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल डील, डोकलाम, शेतकरी प्रश्न, रोजगार, जीएसटी- नोटाबंदी ,अश्या अनेक मुद्द्यांवर मोदींवर जोरदार टीका केली.[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50c9ed13-8cb5-11e8-b8dd-2de663e925bd’]
राहुल गांधींच्या या आरोपावर “जे लोक एवढे दिवस सत्तेत राहिले, तेच आरडाओरड करुन खोटेपणाला खरं करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चुकीची माहिती दिली जात आहे. दोन जबाबदार सरकारच्या मध्ये हा व्यवहार झाला आहे, दोन पक्षांच्या मध्ये नाही. किमान सुरक्षेच्या मुद्द्यावर तरी ही भूमिका घेऊ नका. हा व्यवहार पूर्ण पारदर्शकतेने झालेला आहे.’’ मोदींनी असे उत्तर दिले.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d45babc-8cb5-11e8-8c95-657e0054d583′]