राहुल गांधींच्या मुद्द्याला पंतप्रधानांची जोरदार फटकेबाजी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

काल लोकसभेत भाजपावर टीडीपी सोबतच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा मोदी सरकारवर जोरदार टीकेचा  प्रहार केला. राहुल गांधींनी मोदी सरकारवर केलेल्या प्रहारावर मोदी सरकारने जोरदार फटकेबाजी केली. इतकेच नव्हे तर झालेल्या  गळाभेटीवर राहुल गांधींची फिरकीही घेतली.या बाबत अधिक माहिती अशी की,  काल  लोकसभेत भाजपावर टीडीपीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावात टीडीपी बरोबरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी  राफेल डील, डोकलाम, शेतकरी प्रश्न, रोजगार, जीएसटी- नोटाबंदी ,अश्या अनेक मुद्द्यांवर  मोदींवर जोरदार टीका केली.[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50c9ed13-8cb5-11e8-b8dd-2de663e925bd’]

 राफेलडील  बाबत बोलताना, “आमच्या यूपीएच्या काळात राफेल डीलमध्ये एका विमानाची किंमत ५२० कोटी रुपये ठरली होती. मात्र काय झालं माहित नाही, पंतप्रधान फ्रान्सला गेले, आणि  एका विमानाची किंमत १६०० कोटी रुपये झाली. संरक्षण मंत्री इथे बसलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की आकडेवारी देऊ शकत नाही, तसा दोन्ही देशातला करार आहे. मात्र मी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना विचारलं तर ते म्हणाले असा कोणताही करार झालेला नाही, माहिती सार्वजनिक केली जाऊ शकते. पंतप्रधानांच्या दबावात येऊन संरक्षण मंत्री खोटं बोलल्या आहेत’’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधींच्या या आरोपावर  “जे लोक एवढे दिवस सत्तेत राहिले, तेच आरडाओरड करुन खोटेपणाला खरं करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चुकीची माहिती दिली जात आहे. दोन जबाबदार सरकारच्या मध्ये हा व्यवहार झाला आहे, दोन पक्षांच्या मध्ये नाही. किमान सुरक्षेच्या मुद्द्यावर तरी ही भूमिका घेऊ नका. हा व्यवहार पूर्ण पारदर्शकतेने झालेला आहे.’’ मोदींनी असे उत्तर दिले.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d45babc-8cb5-11e8-8c95-657e0054d583′]

 डोकलामच्या  मुद्द्यावर राहुल गांधींनी “पंतप्रधान गुजरातमध्ये नदीच्या किनाऱ्यावर चीनच्या राष्ट्रपतींसोबत बसले होते. त्यावेळी हजारो सैनिक डोकलाममध्ये होते. पंतप्रधान चीनला जातात आणि म्हणतात की आपण इथे डोकलामवर बोलणार नाही.’’ असा आरोप केला होता.
याच आरोपावर  “मला माहितीये की कधी कधी ज्या विषयाची माहिती नसते, त्यावर बोलल्याने आपल्याच अंगाशी येतं. यामुळे व्यक्तीचं नुकसान कमी आणि देशाचं नुकसान जास्त होतं. जेव्हा  संपूर्ण देश एकजुटीने डोकलामच्या मुद्द्यावर बोलत होता, तेव्हा  राहुल गांधी चीनच्या राजदुतांसोबत बैठका करत होते.’’ मोदींनी असे उत्तर दिले.
तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी यांनी “सरकारमध्ये दलित,शेतकरी,आदिवासी,अल्पसंख्यांक,युवा आणि महिलांवर अन्याय होत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, पण त्यांनी उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आपल्या उद्योजक मित्रांना फायदा मिळवून दिला आहे’’ असा आरोप मोदींवर केला.
त्याचबरोबर “आमचं सरकार २०२२  पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि यासाठी अनेक पाऊलं उचलली आहेत. देशभरातील १५  कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड दिलं आहे, मात्र विरोधकांना यावर विश्वास नाही. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना युरियाची कमी पडू दिली नाही. जनधन योजनेंतर्गत ३२  कोटी खाते उघडण्यात आले आणि उज्ज्वला योजनेंतर्गत ४.५  कोटी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं गेलं’’ असे  बोलून मोदींनी हे आरोप फेटाळून लावले.
याच बरोबर रोजगाराच्याही मुद्यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली, “१५  लाख रुपये आणि रोजगार देण्याचं आश्वासन हा फक्त जुमला आहे. पंतप्रधान जिथे जातात तिथे रोजगाराचं बोलतात. कधी सांगतात पकोडे बनवा, कधी सांगतात दुकान सुरु करा. रोजगार कोण आणणार ? भारतातील तरुणांनी पंतप्रधानांवर विश्वास ठेवला.आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सांगितलं प्रत्येत वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार मिळेल’’
या टीकेवर “सरकारच्या सर्व क्षेत्रातील आकडा एकत्र केला तर गेल्या एक वर्षात एक कोटी रोजगार निर्माण झाले आहेत.हे एका स्वतंत्र एजन्सीच्या हवाल्याने मी सांगत आहे. सरकारी आकडेवारी सांगत नाही. यावर विश्वास ठेवा आणि देशात रोजगाराच्या नावावर खोटं पसरवणं बंद करा’’ असे मोदींनी उत्तर दिले.
माझ्या नजरेला नजर मिळवून  बोलू शकत नाहीत . या प्रश्नाला उत्तर  देत म्हणाले कि, “एक गरीब आईचा मुलगा, मागासलेल्या जातीचा नरेंद्र मोदी असं कसं करु शकतो? मी नजरेला नजर नाहीच मिळवू शकत. नजरेला नजर मिळवलेल्या सुभाषचंद्र बोस यांचं काय झालं देशाने पाहिलं, चौधरी चरण सिंह यांच्यासोबत काय झालं, जय प्रकाश नारायण यांच्यासोबत काय झालं, मोरारजी देसाई यांच्यासोबत काय झालं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत काय झालं, शरद पवार यांच्यासोबत काय झालं?”
तसेच जीएसटी बाबत बोलतानाही राहुल गांधी यांनी  “जीएसटी ही काँग्रेसची संकल्पना होती आणि त्याला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता. आमचं म्हणणं होतं, की पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत असावं. जे छोट्या-छोट्या दुकानदारांच्या मनात आहे, शेतकऱ्यांच्या मनात आहे, ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचत नाही. १०-२० उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी काम करतात. गरीब-मजूरांसाठी यांच्या मनात जागा नाही.” असा आरोपही केला .
याच आरोपावर उत्तर देत मोदी यांनी फटकेबाजी केली. जीएसटीचा विषय एवढे दिवस कुणी अडवून धरला होता आणि सांगितलं गेलं, की गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी तो अडवला. मी काय म्हणालो होतो, ते आत्ताही मिळेल. जर काँग्रेसने राज्यांच्या हिताची चिंता केली असती, तर जीएसटी प्रणाली पाच वर्षांपूर्वीच लागू झाली असती. नोटाबंदीनंतरही अनेक राज्यात भाजपने सत्ता मिळवली. त्यामुळेच स्पष्ट होतं, की देशाच्या जनतेने नोटाबंदीली स्वीकारलं आहे.”