माजी मुख्यमंत्र्यांनी केवळ जाहिरातबाजी केली, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – मागील पाच वर्षे राज्यामध्ये भाजपचे सरकार होते. तर देवेंद्र फणवीस मुख्यमंत्री होते. मागील सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली, भ्रष्टाचार वाढला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यात कोणताही मोठा प्रकल्प वाढवला नाही. त्यांनी फक्त जाहिरातबाजी केली, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

सीएए बाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशात सीएए अंतर्गत बदल करून देशाच्या संविधानावर हल्ला चढवला जात आहे. भाजप सरकारने नोटबंदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवला. त्या पद्धतीने एनआरसी आणि सीएए कायद्यावरून मोदींनी हल्ला केला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.यामुळे देशात विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.

अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले
अमित शहा यांनी देश काँग्रेसमुक्त… काँग्रेसमुक्त नसून विरोधीपक्ष मुक्त होत आहे. ज्यांच्या सहकारी संस्था आहेत त्यांना धमकावून त्यांना आपल्याबाजूने वळवले. अर्थव्यवस्था अडचणीत आल्याचे खापर निर्मला सिताराम यांच्यावर फोडलं जात आहे. आंतरराष्ट्रीय सल्लागार यांचा सल्ला न घेतल्याने देशाची अर्थव्यवस्थेचे वाटोळे केल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला.

शहांनी मोदींना खोटे पाडले
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विसंगती दिसून येत आहे. मोदींनी संसदेत एनआरसी कायद्याबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र दोनच दिवसात अमित शहा यांनी नागरिकत्व कायद्याचा मसुदा सभागृहात माडून मोदींना खोटे पाडल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –