‘कॉमेडी’ सर्कस चालवू नका, अर्थव्यवस्था सुधारा ! प्रियांका गांधींचा भाजप मंत्र्यांना टोला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नोबेल पुरस्कारासाठी निवड झालेले अर्थतज्ञ अभिजीत बनर्जी यांच्याविषयी वक्तव्य केले होते. यावर आता काँग्रेस सचिव प्रियंका गांधींनी गोयल यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या मंत्र्यांचे काम कॉमेडी सर्कस चालवणे नसून अर्थव्यवस्थेत सुधारणा करणे आहे.
याबतचे एक ट्विट देखील प्रियांका गांधी यांनी केले आहे. यात त्या म्हणतात, भाजप नेत्यांना जे काम मिळाले आहे ते करण्याऐवजी ते इतरांच्या चुका काढत बसले आहेत. नोबल मिळवणाऱ्याने आपले काम इमानदारीमध्ये केले आणि नोबेल जिंकले सुद्धा. प्रियांका पुढे म्हणतात अर्थव्यवस्था कमजोर होत चालली आहे, तुमचे काम अर्थव्यवस्था सुधारणे हे आहे, कॉमेडी सर्कस चालवणे नाही.
भाजपा नेताओं को जो काम मिला है उसको करने की बजाय दूसरों की उपलब्धियों को झुठलाने में लगे हैं। नोबेल पाने वाले ने अपना काम ईमानदारी से किया, नोबेल जीता।
अर्थव्यवस्था ढही जा रही है। आपका काम उसको सुधारना है न कि कॉमेडी सर्कस चलाना।https://t.co/DfZXAMmaxg
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 19, 2019
पियुष गोयल यांनी अभिजित बॅनर्जी यांच्याबाबत वक्तव्य करताना म्हटले होते की, मी बॅनर्जी यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन करतो. मात्र आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की त्यांचे विचार हे वामपंथी आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की बॅनर्जी यांनी काँग्रेसने प्रस्थापित केलेल्या न्याय योजनेचे समर्थन केले होते. मात्र सध्याची भारतीय अर्थव्यवस्था डगमगलेली असून ती लवकर सुधारणार नसल्याचे बॅनर्जीं यांनी सांगितले.
Visit : Policenama.com
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या