नवीदिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसकडून आज देशभर नागरी सुधारणा कायद्यविरोधात आंदोलन करण्यात येत आहे विशेष म्हणजे काँग्रेसचा आज स्थापना दिवस आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने सीएएला जोरदार विरोध दर्शवला आहे. देशभरात यासाठी शांतता पूर्वक रॅलीकाढून अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे.
भारत बचाओ, संविधान बचाव अशा घोषणा देत फ्लॅग मार्च काढण्यात आला. अनेक राज्यांमध्ये यावेळी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील इतर विरोधी पक्ष एनआरसी आणि सीएए बाबत काहीच करत नाही कारण त्यांना भीती वाटत आहे म्हणून आपल्यालाच सीएए विरोधात लढावे लागणार आहे आणि आम्ही कोणालाही घाबरत नाही अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीला जोरदार टोला लगावला आहे.
https://twitter.com/ANINewsUP/status/1210844039911821312
सीएए विरोधात अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाल्याचे पहायला मिळाले आहे. विद्यार्थी आणि तरुण आपला आवाज उठवत आहेत मात्र सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण करून ठेवलेले आहे. आज आम्ही अशा विचारधारे विरोधात लढत आहोत ज्याचा देशाच्या स्वातंत्र्यात काहीच भूमिका नव्हती अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने सीएए विरोधात आपला पाठींबा दर्शवला आहे त्यामुळेच आता देशभरात या विरोधात अनेक लोक रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवताना पहायला मिळाले आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- 8 तासांपेक्षा जास्त झोप घेता ? ‘या’ 4 प्रकारे जीवाला होऊ शकतो धोका !
- ‘या’ 4 पदार्थांचा आहारात समावेश केला तर वाढेल स्मरणशक्ती !
- ‘अॅसिडिटी’मुळे आहात हैराण ? करा ‘हे’ 4 घरगुती उपाय
- चुकूनही ‘या’ 5 छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा पडू शकतं महागात !
- उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ ९ उपाय करा ! जाणून घ्या
- हसण्याचे ‘हे’ आहेत ७ फायदे, ‘हार्टअटॅक’चा धोकाही होतो कमी
- सावधान ! पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरल्यास होतात ‘हे’ 4 धोके