देशातील पहिला हवेपासून पाणी तयार करण्याचा प्रकल्प

कोळपिंपरी गावाचा थक्क करणारा प्रवास…

पिंपरी-चिंचवड :पोलीसनामा ऑनलाईन
कृष्णा पांचाळ

बीड जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेने पुन्हा अनेक गावांना गत वैभव मिळवून दिलय.गाव टँकरमुक्त झाली आहेत.तर धारूर तालुक्यातील कोळपिंपरी गावाची आधुनिक युगाकडे वाटचाल ठरत असून हवे पासून पाणी तयार करणारा प्रकल्प बसविण्यात आला आहे.महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प अमेरिकेतील झिरो मास वॉटर सोर्स ही संस्था राबवत आहे.देशातील पहिलाच प्रकल्प असल्याचं बोललं जातं आहे.या प्रकल्पाची (यंत्राची) किंमत तब्बल ३० लाख रुपये आहे.त्यामुळे एकेकाळी दुष्काळ ग्रस्त असणाऱ्या कोळपिंपरी गावात चक्क आता अमेरिकेतील संस्था प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे देशात कोळपिंपरी आणि बीड च नावलौकिक होत आहे.

मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अशोक हतागळे आणि ग्रामसेवक अमोल राऊत हे तरुण शासकीय अधिकारी गेल्या दोन वर्षापासून गावात ठिय्या मांडून आहेत.यांनी गावात योजना आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे.महाराष्ट्र शासनाकडून ३५० गावां पैकी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कोळपिंपरी गावाची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली.अमेरिकेमधून सॅटेलाईट द्वारे या गावच्या परिसराची पाहणी करण्यात आली.या प्रकल्पासाठी योग्य जागा तपासण्याची वेळ घेतला गेला आणि कोळपिंपरी गावाची निवड करण्यात आली.यंत्र बसवण्यासाठी अमेरिकेमधून इंजिनिअर बेंझामीन आले होते,गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छतावर सौर ऊर्जा आणि हायड्रो पॅनलच्या सहा प्लेट बसवण्यात आल्या,या सहा प्लेट मध्ये हवेपासून तयार झालेलं पाणी साठत.प्रत्येक प्लेट मध्ये पाच लिटर पाणी जमा होते.हेच शुद्ध पाणी नलिका द्वारे थेट छोट्या फिल्टर मध्ये जाते,पाणी जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थाना मिळत आहे.या प्रकल्पाला वीज लागणार नाही. अश्या प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात आहे,देशातील हा पहिला प्रकल्प असल्याची माहिती मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अशोक हतागळे यांनी दिली आहे.यामुळे गावात नवचैतन्य निर्माण झालं आहे.विशेष म्हणजे या प्लेटामध्ये एक चिप बसविण्यात आली ज्यामुळे अमेरिकेतून हे यंत्र हाताळण्यात येणार आहे,यंत्रात बिघाड किंवा यंत्र चोरीला गेलं तर याकडे अमेरिकेमधून लक्ष ठेवणार आहेत.

दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखलं जाणार कोळपिंपरी गाव आता अमेरिकेपर्यंत पोहचल आहे.दोन वर्षांपूर्वी धारूर तालुक्यातील कोळपिंपरी गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं.परंतु वॉटर कप स्पर्धेमधून एक लोकचळवळ उभी झाली.येथील ग्रामस्थांनी रात्रीचा दिवस केला आणि वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला.पुण्याच्या बालेवाडीत भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला,मराठी सिनेअभिनेते सचिन पिळगावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोळपिंपरी गावकऱ्यांना पारितोषिक मिळाले. कधी मुंबई-पुणे न पाहणारे नागरिक भारावून गेले आणि घामाची किंमत त्यांना मिळाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ठळक दिसत होतं.खर बक्षिक त्यांना यावर्षीच्या उन्हाळ्यात मिळालं,ते म्हणजे पाण्याचा वनवास संपला होता….विहिरी गच्च भरून वहात आहेत.जिल्ह्यातील गाव या आदर्श गावाला भेटी देत आहेत.आपलं गाव देखील दुष्काळ मुक्त करण्याचा निर्धार तेथील नागरिक करत आहेत.या गावाची ख्याती आता देशभरात होत आहे.८ एप्रिल पासून सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेसाठी गावकऱ्यांनी मेहनत घेत काम सुरू केलं आहे.टिकाव आणि कुदळ घेऊन पहाटे साडेपाच वाजल्यापासून काम सुरू असतात..

उषा विजयकुमार खुळे (कोळपिंपरी गावचे सरपंच)

“ज्या गावात डिसेंबरला टँकर लागायचे त्या गावात आज गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे व शासनाच्या मदतीने हवेतून पाणी करण्याचा देशातील पहिला “प्रकल्प”गावात उभा राहिला आहे.गावच कायापालट केवळ लोकचळवळ आणि नागरिकांच्या मेहनतीमुळे शक्य झालं.गावाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर राहू गावाचे नाव देशाच्या नकाशावर कसे येईल यासाठी प्रयत्न करू..