नरेंद्र मोदींच्या हातातच देश सूरक्षित : रावसाहेब दानवे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – देशामध्ये सध्याची परिस्थिती पाहता ती युद्धजन्य अशी आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. खरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हातात हा देश सुरक्षित राहू शकतो. अशी भावना देशातील जनतेच्या मनात आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा आणि मोदींचे हात बळकट करा,’ असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कार्यकर्त्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘राज्यात झालेली ही महायुती अभेद्य आहे, तीला आता कोणीही मोडून काढू शकणार नाही हे कोल्हापुरातील महामेळाव्यात विराट जनसमूदायाच्या उपस्थितीतून दिसून आले आहे. महालक्ष्मीच्या साक्षीने राज्यात महायुतीच्या सर्व उमेदवार निवडून येऊन देशात पुन्हा युतीची सत्ता येऊन पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. असा आत्मविश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.