मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी द्यावा, अशा मागणीचे आश्वासन माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सकाळी दिले.
मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. मा. राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2019
त्याचप्रमाणे मुख्य मंत्री सहाय्यता निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातून व्हावे, निधीचे वितरण होऊन लोकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी फडणवीस यांनी केली. दोन्ही मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
भाजपच्या बैठकीत शेतकरी प्रश्नासाठी कृती करण्याचे ठरले. लगेचच फडणवीस यांनी राज्यपाल भेट घेतली, भाजपचे अन्य नेते शेती पहाणीसाठी दौरे करणार आहेत.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय