कर्जत – आपटा एसटी बसमध्ये बॉम्ब आढळल्याने खळबळ
पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे. या तपासात एनआयएला पोलीस, लष्कर, गुप्तहेर यंत्रणा मदत करतील.
२,५०० जवानांना घेऊन ७८ लष्करी वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला १४ फेब्रुवारी रोजी चाललेला असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अवंतीपोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. एनआयएने या प्रकरणी पुन्हा गुन्हा नोंदविला आहे. ३५० किलो आरडीएक्स भरलेली मारुती इको व्हॅन सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर जिथे धडकविण्यात आली, त्या ठिकाणाहून स्फोटकांचे नमुने एनआयएने याआधीच गोळा केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अकरा ते बारा संशयितांची या यंत्रणेने चौकशी सुरू केली आहे.