काँग्रेसचा मोदी सरकारवर ‘सर्जिकल स्ट्राइक’
मध्य प्रदेशातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा माल पाकिस्तानमध्ये न पाठविण्याचा निर्णय घेतला. अटारी -वाघा बॉर्डरमार्गे दररोज किमान ७५ ते १०० ट्रक टोमॅटो व इतर भाजीपाला पाकिस्तानला निर्यात केला जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर ही निर्यात बंद झाली आहे. त्याचा थेट परिणाम लाहोरमधील भाजी मंडईत दिसत आहे. तेथे टोमॅटो १८० रुपये किलो, भेंडी १२० रुपये तर ढोबळी मिरची ८० रुपये किलो भावाने विकली जात आहे. इतर भाज्याही कडाडल्या आहेत.
२०१७ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. तेव्हाही निर्यात बंद करण्यात आली होती. तेव्हा टोमॅटो ३०० रुपये किलो भावाने विकला गेला होता. आताही पाकिस्तानमध्ये भाज्यांचे भाव असेच कडाडलेले राहण्याची शक्यता आहे.