बँक खाते लष्कराशी किंवा सरकारशी संबंधित नाही. त्यामुळे हे खाते कुणाचे आहे. हा लोकांच्या भावनांशी खेळ आहे की ? लोकांना लुटण्याचा प्रयत्न आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याअगोदर २०१६ मध्ये जेव्हा उरीतल्या लष्करी तळावर हल्ला झाला. त्यावेळीही असाच मॅसेज व्हायरल झाला होता. पुलवामातील हल्ल्यानंतर हा मॅसेज वेगाने व्हायरल झाला. पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झालेत. हे जवान केंद्रीय गृहमंत्रालयाशी संबंधित आहेत. त्यामुळे या व्हायरल मॅसेजमधील खोटेपणा उघड झाला आहे.
सोशल मीडियावर जे बँक खाते देण्यात आले आहे. ते सैनिक कल्याण निधीचे देण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दलाशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे असे मॅसेज आल्यावर त्यांची चिकित्सा करणे कधीही योग्य आहे. सोशल मीडियात भावनांचा बाजार मांडला जातो. सैनिक कल्याण निधीच्या फसव्या मॅसेजच्या माध्यमातूनही भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे.