‘पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी सर्वप्रथम मसूद अजहरला संपवणे गरजेचे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी (दि- 14) भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. याचा देशभरातून निषेत करत संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे. यानंतर याबाबत निवृत्त कर्नल विजय चंद्रचूड यांनी भाष्य केलं आहे. मसूद अजहरला संपवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विजय चंद्रचूड म्हणाले, “आपल्याला जर त्यांना (दहशतवादी आणि पाकिस्तान) बिफीटींग रिप्लाय द्यायचा असेल तर मसूद अजहरला संपवणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना संपवणे हाच सर्वात मोठा उपाय आपल्याकडे आहे.”

या प्रकाराला धर्माचा रंग देणंही योग्य नाही

पुढे बोलताना चंद्रचूड म्हणाले की, “दहशतवाद हा आत्ताचा प्रश्न नाही. पुलवामासारखी घटना घडली की आपलं आणि सरकारचं हायपर सेन्सिटिव्ह होणं योग्य नाही. तसेच या प्रकाराला धर्माचा रंग देणंही योग्य नाही. आपल्याला जर त्यांना सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर मसूद अजहरला संपवणं आवश्यक आहे.”

आपणंही दुसऱ्या देशात जाऊन शत्रूला संपवलं पाहिजे

चंद्रचूड म्हणाले की, “बाय हूक ऑर क्रुक त्यांना संपवलं पाहिजे. आपण हे करु शकतो. अमेरिका किंवा इस्राईलने दुसऱ्या देशात जाऊन शत्रूला संपवलं. म्हणून आपणही तसंच करावं का? यासंबधी आपल्या हिताचा जो निर्णय असेल तो आता घेणं गरजेचं आहे. दहशतवादाला संपवण्यासाठी लष्कर पुरेसे नाही, सर्व यंत्रणांनी एकत्र येणं आवश्यक आहे.”