Pune News : पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघाता (accident ) त तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोणी काळभोर, वानवडी व वारजे परिसरात या अपघाता (accident ) च्या घटना घडल्या आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन भागात भरधाव कारने दुचाकीस्वर दाम्पत्याला पाठीमागून धडक दिली.
यात पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला.
लता पांडुरंग दुधाळ (वायू 48) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लता दुधाळ व त्यांचे पती शुक्रवारी दुपारी दुचाकीवरुन जात होते.
त्या उरुळी कांचन येथील धुपटे फर्निचरसमोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या करणे त्यांना जोरात धडक दिली.
त्या  गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.तर त्यांचे पती जखमी झाले आहेत.

तर दुसरा अपघात वारजे भागात झाला आहे.
मुंबई बंगलोर रस्त्यावरील चांदणी चौकात झालेल्या अपघातात पादचारी शितलराज विश्वास पाटील (वय 36) यांचा मृत्यु झाला आहे.
शितल राज हे पायी जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली.
याप्रकरणी दुचाकीचालक अक्षय अशोक धुमाळ (वय 21) याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर वानवडीत काळेपडळ रेल्वे गेट जवळ झालेल्या अपघातात चंदुलाल चेतन दिसले (56 वर्षे) यांचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या एका कार ने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. यावेळी पाठीमागे बसलेल्या चंदूलाल दिसले यांचा मृत्यू झाला आहे. वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार या कार चालकाचा शोध घेतला जात आहे.

चंद्रकांत पाटलांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाबाबत केलेल्या विधानाचा संजय राऊतांकडून समाचार, म्हणाले…