Pune Fire News : 18 जणांचा आगीत होरपळून मृत्यू; कंपनी मालक निकुंज शहाविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिरंगुट येथील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आग Fire प्रकरणात पोलिसांनी कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. या आगीत Fire 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात 15 महिलांचा समावेश आहे. तर 3 पुरुषांचा समावेश आहे.

याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मालकांने केलेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहेत. एमआयडीसी भागात एसव्हीएस केमिकल बनविणारी ही कंपनी आहे. याठिकाणी जंतुनाशकांची निर्मिती केली जाते. तर सॅनिटायझर देखील बनविले जात होते. दरम्यान सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. यात 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे.

 

या आगीत मृत्यू झालेल्याची नावे..

मंदा भाऊसाहेब कुलट (वय 45), संगीता उल्हास गोंदे (वय 36), गीता भारत दिवारकर (वय 38), त्रिशला संभाजी जाधव (वय 33, सर्व रा. उरवडे, ता. मुळशी), सुरेखा मनोहर तुपे (वय 45, रा. करमोळी, ता. मुळशी), सुनिता राहुल साठे (वय 28, रा. भालगुडी, ता. मुळशी), अतुल लक्ष्मण साठे (वय 23, रा. भालगुडी, ता. मुळशी), सारिका चंद्रकांत कुदळे (वय 38, रा. पवळे आळी, पिरंगुट, ता. मुळशी), धनश्री राजाराम शेलार (वय 22) संगीता अप्पा पोळेकर (वय 42), महादेवी संजय आंबारे (वय 35, सर्व रा. पिरगुंट कॅम्प, ता. मुळशी), अर्चना व्यंकट कवडे (33), शीतल खोपकर, मंगल बबन मरगळे, सुमन संजय ढेबे, सीमा सचिन बोराडे (वय 30), सचिन मदन घोडके (वय 25) यांचा मृत्यू झाला.

ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी

आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांत 15 महिलांचा समावेश आहे.

कामगारांचे मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटत नाही.

त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी आता मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) घेण्यात येतील.

डीएनए चाचणी तसेच रक्तांच्या नमुन्याद्वारे मृतांची ओळख पटविण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

मृतांची लवकरात लवकर ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

पुण्यातील पाषाण रस्त्यावर असलेल्या न्यायवैद्याकीय प्रयोगशाळेसह नाशिक, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने पाठविण्यात येणार आहेत.

Also Read This : 

 

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या

‘आपल्याकडे प्रथा पडलीये, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं’, CM ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडीओ)