पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून होणार्‍या शिवीगाळ मारहाणीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बिबवेवाडी येथे सोमवारी ही घटना घडली आहे. गौरी रामदास गायकवाड (वय 24, रा. अपर इंद्रिरानगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रामदास बाळासाहेब गायकवाड (वय 32, रा. इंद्रिरानगर ) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, नातेवाईकांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गौरी यांचा भाऊ जयदीप हांडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास आणि गौरी यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. विवाहनंतर ते बिबवेवाडी परिसरात राहत होते. विवाहानंतर काही महिन्यांनी रामदास सातत्याने गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून तो गौरीा यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण व शिवीगाळ करत असे. तर, इतर नातेवाईकही तिला शिवीगाळ करीत होते. सततच्या या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून गौरी यांनी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. अधिक तपास सहायक निरीक्षक बी. आर. आडके अधिक तपास करीत आहेत