पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून विश्रांतवाडी परिसरात टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. खुनानंतर आरोपी तेथून पसार झाले. अद्याप कोणाला पडकण्यात आलेले नाही. रात्री साडे बारा वाजता ही घटना घडली आहे.
सागर महादेव भालेराव (वय 24, रा. विश्रांतवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा बिगारी काम करत होता. दरम्यान रात्री जेवणानंतर तो आणि त्याचे दोन मित्र येथील गणपती मंदिर चौकातून पायी चालत जात होते. यावेळी त्यांच्यासमोरून एक बुलेटस्वार गेला. सागरला तो आपला मित्र असल्याचे वाटले म्हणून त्याने आवाज दिला. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून आणखी एक दुचाकीवाला आला. त्याने सागरला का, आवाज दिला तू कोण आहेस असे विचारले. यावरन त्यांच्यात वाद झाला.
त्यानंतर आलेल्या 4 ते 5 जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत सागर याचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर आरोपी तेथुन पसार झाले. अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. पथके आरोपींच्या मागार असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ठोस कारण कळेल असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.
- थंडीच्या दिवसात प्या ‘आल्याचे पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे !
- ‘कापूर’ वाढवेल तुमचे आरोग्य आणि सौंदर्य ! जाणून घ्या 5 फायदे
- बटाट्याची साठवण करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
- सावधान ! ‘च्युइंगम’ चुकून गिळल्यास होऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने हात धुवा स्वच्छ, अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव
- प्रमाणापेक्षा जास्त घाम का येतो ? जाणून घ्या 3 कारणे आणि 3 उपाय !