Pune : नव विवाहितेची कात्रज तलावात उडी मारून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  नव विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने तिने कात्रज तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तीनच महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.
अंजली मंगेश साळुंखे (22) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नथू मारुती भोसले (वय ४६, रा. मांगडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश महादेव साळुंखे, संगीता महादेव साळुंखे आणि प्रियंका महादेव साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश व अंजली यांचा जून २०२० मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी सासू संगीता, नणंद प्रियंका आणि पती मंगेश अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेउ लागले. तिघांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ करुन मारहाण केली. त्यामुळे त्रासाला कंटाळून अंजलीने २५ सप्टेंबरला कात्रजच्या तलावात उडी मारुन आत्महत्या केली. अधिक तपास सहायक निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी करीत आहेत.