Pune News : सोडून दिलेल्या पत्नीसोबत लग्न केल्याच्या रागातून 12 जणांच्या टोळक्याकडून महिलेसह तिघांवर तीक्ष्ण हत्याराने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोडून दिलेल्या पत्नीसोबत लग्न केल्याच्या रागातून 12 जणांच्या टोळक्याने एका महिलेसह तिघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा (murder ) प्रयत्न केल्याची घटना वाकडेवाडीत घडली. यात एकाच्या हाताची बोटे तुटली असून, दुसरे दोघे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात बाजीराव हैदर शफा इराणी (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्ली अब्बास शॉकत इराणी याच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्ली याचे लग्न झाले होते. पण त्याने पत्नीला सोडून दिले. यानंतर फिर्यादी याने त्याच्या पत्नीसोबत विवाह केला. याचा राग आरोपींच्या मनात आला होता. दरम्यान फिर्यादी आणि त्याचे नातेवाईक बोलत बसले असताना आरोपी एकत्र जमले. त्यांनी कोयते तसेच तीक्ष्ण हत्यारे घेऊन त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर फिर्यादीवर वार केले. यात त्यांच्या हाताची बोटे तुटली. तर फिर्यादीची मावशी व मामाच्या मुलाच्या डोक्यात देखील वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. वस्तीत अचानक झालेल्या या हल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.