पुण्यातील नाना पेठेत अनैतिक संबंधातून ‘रेश्मा शर्मा’चा खून करून पसार झालेल्या ‘प्रेम’ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेम प्रकरणातून विवाहितेचा राहत्या घरात खूनकरून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली. पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.

प्रेम जोधाराम माळी (वय 32, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यात रेश्मा शर्मा (30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच दिवसांपूर्वी (दि. 12 मार्च) रेश्मा एकट्याच घरी होत्या. त्यांचे पती हे कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यांनी दिवसभर पत्नी रेश्माला फोन केले. पण त्या फोन उचलत नव्हत्या. ते संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास परत आले. यावेळी त्यांना बाहेरून घराला कुलूप असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन पाहिले असता घरात रेश्मा यांचा मृतदेह मिळून आला होता. दरम्यान भरवस्तीत महिलेचा राहत्या घरात मृतदेह मिळाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. माहिती घेतल्यानंतर ओरोपी माळी याने प्रेम प्रकरणातून खून केला असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांनतर त्याचा शोध घेण्यात येत होता.

त्याचा शोध घेतला जात होता. परंतु तो मिळून येत नव्हता. गुन्हे शाखेच्या युनिट एककडून त्याची माहिती काढत असताना कर्मचारी सचिन जाधव यांना माहिती समजली की आरोपी पीएमटी वर्कशॉपजवळ उभा आहे. त्यानुसार उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, सचिन जाधव, तुषार माळवदकर, अजय जाधव व त्यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.