राजस्थानमध्ये पोलीस निरीक्षक, काँस्टेबलची हत्या करणाऱ्या तिघांना पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची चकमकीत हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात रात्रभर सर्च आॅपरेशन करुन अटक केली. विभोरसिंह, साकेतसिंह आणि रामपाल गिरीधारीलाल रनैवाल अशी त्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, पोलीस निरीक्षक मुकेश कानुनगो आणि पोलीस काँस्टेबल रामप्रकाश अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत. गेल्या शनिवारी फतेहपूर येथे ही चकमक झाली होती. राजस्थान पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. त्या टोळीतील काही जण पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राजस्थान पोलिसांचे पथक शनिवारी पुण्यात आले होते. राजस्थान पोलिसांनी संशयित गुंडांचे फोटो पुणे पोलिसांना दिले होते. त्यांच्या मोबाईलवरुन लोकेशन घेण्यात आले. ते बावधन येथील निघाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7c48fee-cf8f-11e8-bc44-09b60d8460bc’]

पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांच्या सूचनेनुसार शनिवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक यांची पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण बावधन परिसरात रात्री शोध मोहिम सुरु केली. तेथील विविध इमारतीत राहणाºया लोकांची माहिती घेण्यात येऊ लागली. संशयास्पद आढळणाºया तरुणांची चौकशी सुरु केली. काही इमारतींची माहिती घेतल्यावर एका इमारतीत ११ जण रहात आल्याचे आढळून आले. त्या सर्वांची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्या गुंडांचे फोटो पोलिसांकडे होते. ते तिघे तेथे आढळून आले.त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी आपण या गावचेच नसल्याचा बहाणा केला. मग पोलिसांनी त्यांना आपला खाक्या दाखविल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यानंतर पहाटे त्यांना राजस्थान पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279,B071HWTHPH,B0784BZ5VY,B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bdec4192-cf8f-11e8-8e8f-35384771df4e’]

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशनम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, राजेंद्र कदम व त्यांच्या पथकांनी ही कामगिरी केली.

कुप्रसिद्ध गुंड अजय चौधरी व त्याची टोळी फतेहपूर येथे असल्याची माहिती मुकेश कानुनगो यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गेल्या शनिवारी रात्री बेसवा गावाजवळ त्यांचा पाठलाग केला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस व गुंड समोरासमोर आल्यावर त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस निरीक्षक आणि पोलीस काँस्टेबल यांना गोळ्या लागून त्यात ते शहीद झाले होते. यामुळे संपूर्ण राजस्थानामध्ये मोठी खळबळ उडाली होती.