Pune : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांनी केला ‘बहिर्जी नाईक’ पुरस्कारानं गौरव

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलीस दलाची नव्याने सुञे हाती घेतलेल्या पोलिस अधिक्षक डॉ .अभिनव देशमुख यांनी चांगले काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे कौतुक करत प्रशंसापञक देउन सन्मान केला आहे. या कौतुकमुळे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काही दिवसापुर्वीच पुणे ग्रामीण पोलिस दलाची सुञे हाती घेतली आणि जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या मदतीने अनेक धडाकेबाज कारवायाचा धडाका सुरु केला आहे.

या कारवाईमध्ये काही कर्मचारी, अधिकारी यांनी मोठी मेहनत घेतली आहे.याच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीची दखल घेत पोलिस अधिक्षक डाॕ देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत हे पुरस्कार संबंधित कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आले.यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र कोरवी आणि किरण कुसाळकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘”बहिर्जी नाईक”पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

त्यांनी शिरूर आणि वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या आरोपींकडून त्यांनी ८ पिस्टल आणि ९ राउंड हस्तगत केले होते.तसेच संघटित गुन्हेगारी विरोधी प्रभावी कामगिरी केल्याबद्दल सहायक पोलिस अधीक्षक नवनित कावत यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांनी कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी ८६ लाख ७८ हजार रुपये किमतीचा ५७८ किलो गांजा जप्त केला होता.

तर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे, निरंजन नरवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी सकाटे, होनमाने, ऋषिकेश व्यवहारे, मारकड पिलाने, दीक्षित, जाधव, होळकर, जाधवर आणि शिंदे यांना सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार देण्यात आला.बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३१२ किलोचा गांजा जप्त केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगुटे, पोलीस कर्मचारी विनोद लोखंडे, नंदू जाधव, मंगेश कांबळे प्रशांत राऊत यांना सर्वोत्कृष्ट मुद्देमाल हस्तगत पुरस्कार देण्यात आला.

अशा स्वरूपामध्ये केलेल्या कामाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मध्ये काम करण्यामध्ये नवीन ऊर्जा आणि उमेद निर्माण होत असते तर कौतुकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.