पुष्कर सोबत केले असते लग्न – सई  लोकूर  

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
कलर्स मराठी वरील नावारूपास आलेली मालिका ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात सध्या पुष्कर जोग आणि सई लोकुर आपल्याला स्पर्धकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या दोघांमध्ये निखळ मैत्री आहे. ते या कार्यक्रमातील या दोघांच्या केमिस्ट्रीची खूपच चांगली चर्चा रंगली आहे. त्या दोघांमध्ये खूपच छान मैत्री असून कार्यक्रमात पुष्कर आणि सई दोघे सतत एकत्र असल्याचे आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतेय. एवढेच नव्हे तर ते दोघे एकमेकांना पहिल्या भागापासून मदत करताना दिसून आले आहेत.छोट्या छोट्या गोष्टीत ते एकमेकांची काळजी घेताना दिसत होते.सई आणि पुष्कर यांच्यात निखळ मैत्री आहे. त्यांच्यात मैत्री पेक्षा आणखी काहीच असू शकत नाही असे त्या दोघांचे देखील स्पष्ट मत आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2fd8bb49-8be3-11e8-8a62-79477761b6ea’]

बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, पुष्कर जोग, मेघा घाडे, अस्ताद काळे आणि स्मिता गोंदकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना भरभरून उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेच्या दरम्यान सईला विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांना तिने भरभरून उत्तरे दिली. एका प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तरावर सगळ्यांना हसू आले. सईला विचारण्यात आले होते की, पुष्कर आणि तुझी केमिस्ट्री खूप चांगली आहे. तुम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहात. जर पुष्करचे लग्न झाले नसले तर त्याचा तू विचार केला असतास का? यावर हसत उत्तर देत सई म्हणाली, मी अनेकवेळा मस्करीत बोलते की, माझी बस सुटलेली आहे. हा पण पुष्करचे लग्न झाले नसते तर मी ही बस नक्कीच पकडली असती.
या  प्रकारचा प्रश्न  पुष्करला देखील विचारण्यात आला होता. त्यावर हसत पुष्कर सांगतो, माझे लग्न झाले असून मला एक गोड मुलगी आहे. मी माझ्या संसारात खूपच खूश आहे.आणि पण  जर माझे लग्न झाले नसते तर मी नक्कीच सईचा विचार केला असता.बिग बॉस या रिअॅलिटी शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. अस्ताद काळे आणि पुष्कर जोगने या कार्यक्रमाच्या फायनल पर्यंत धडक मारली आहे. आता या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.