अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात भाजपा पक्षातील सर्वजण एकवटले असताना विखे पिता-पुत्र मात्र एकाकी पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केल्याच्या संशयावरून बीजेपीचे सर्व जण विरोधात एकवटले आहेत. पिता-पुत्र एकाकी पडल्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिपदाची संधी हुकणार का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव, राहुरी, पारनेरसह इतर अनेक मतदारसंघातील महायुतीच्या जागा विखे पिता-पुत्रांच्या पाडापाडीच्या राजकारणामुळे कमी झाल्या. ही बाब जिल्ह्यातील पराभूत मंत्री राम शिंदे व इतर पराभूत आमदार, विजयी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. पिता-पुत्रांनी केलेले राजकारण लेखी स्वरुपात त्यांच्याकडे मांडलेले आहे.
जिल्हा भाजपात पिता-पुत्र एका बाजूला व भाजपचे इतर सर्व एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा राजकीय परिस्थितीत एकाकी पडलेली पिता-पुत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या बाजूने जिल्ह्यातील भाजपाचा एकही जबाबदार व्यक्ती नाही. त्यामुळे यंदा राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिपदाची संधी हुकणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या