पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यातील भाजपमध्ये ओबीसीविरूद्ध अन्य असे दोन गट पडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा जाहीररित्या वाचल्याने या चर्चेला पुष्टी मिळत आहे. भाजपमधील या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे.
खासदार शेट्टी म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोडले तर भाजपमध्ये ओबीसीसह सर्वच समाज घटकांवर अन्याय होत आहे. राज्यात आज शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ, सिंचन यासारखे असंख्य प्रश्न आहेत. पण, त्याकडे कुणी पहात नाही. शेतकरी किड्या-मुंग्यासारखा मरत आहे. हे प्रथम थांबवले पाहिजे.
स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या वादाबाबत खासदार शेट्टी म्हणाले, शेतकरी प्रश्नापुढे सावरकर यांच्यावरील वाद निरर्थक आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. १ रुपये १६ पैसे दराने शेतीसाठी वीज द्या.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- अशी मिळवा ‘किडनी स्टोन’पासून सुटका, करा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- वीकेंडला झोप पूर्ण करून घ्या, अन्यथा पडू शकते महागात, वाचा ‘हे’ ३ निष्कर्ष
- रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !
- कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या
- ‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती