पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, त्याचा रोजगार वाढीलाही फटका बसला आहे. सरकारने संसदीय समितीला माहिती देताना 10 कोटी नोकर्या धोक्यात आल्याची माहिती दिली आहे. या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली असून, मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत, असा आरोप केला आहे.
मोदी देश को बर्बाद कर रहे हैं।
1. नोटबंदी
2. GST
3. कोरोना महामारी में दुर्व्यवस्था
4. अर्थव्यवस्था और रोज़गार का सत्यानाशउनके पूँजीवादी मीडिया ने एक मायाजाल रचा है। ये भ्रम जल्द ही टूटेगा।https://t.co/8JWoOY1jGK
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 30, 2020
वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी बैठकीत केंद्रीय अधिकार्यांना धोक्यात आलेल्या नोकर्यांबद्दल माहिती दिली. कोरोनाचा परिणाम झाल्यामुळे देशात 10 कोटी नोकर्या संकटात असल्याचे केंद्र सरकारने समितीला सांगितले होते. हे वृत्त ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करीत, मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत.
पहिली नोटाबंदी. दुसरी जीएसटी. तिसरी करोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथ म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी मायाजाळ तयार केले आहे. हे भ्रम लवकर तुटणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.