नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्यांना पुन्हा दिल्लीला परतावे लागले आहे. पटना येथे जाताना त्यांच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बिहार, ओऱीसा आणि महाराष्ट्रातील पुढील सभांना आणि बैठकांना उशीर होणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. आज संगमनेर येथेही त्यांची सभा होणार आहे. परंतु तीही आज उशीरा होईल असे दिसते.
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी देशभरातील लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. आज सकाळी ते बिहारच्या समस्तीपुर येथे सभेला संबोधित करणार होते. त्यानंतर महाराष्ट्रातील संगमनेर येथे त्यांची आज सभा होणार आहे. परंतु सकाळी पटना येथे जात असताना त्यांच्या विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यानंतर त्यांना विमान पुन्हा दिल्लीकडे वळवावे लागले. ते दिल्लीत परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्तीपुर, ओरिसातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथील सभेला उशीर होणार आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.
Engine trouble on our flight to Patna today! We’ve been forced to return to Delhi. Today’s meetings in Samastipur (Bihar), Balasore (Orissa) & Sangamner (Maharashta) will run late. Apologies for the inconvenience. pic.twitter.com/jfLLjYAgcO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2019
Congress President Rahul Gandhi, tweets, "Engine trouble on our flight to Patna today! We’ve been forced to return to Delhi. Today’s meetings in Samastipur (Bihar), Balasore (Orissa) & Sangamner (Maharashta) will run late. Apologies for the inconvenience." (file pic) pic.twitter.com/eTa6JCXn3C
— ANI (@ANI) April 26, 2019