नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा चालू होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राहुल गांधी अमेठीसह केरळमधील काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. याबाबतची काँग्रेसने आज अधिकृत घोषणा केली आहे. मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी दिली.
AK Antony,Congress: Rahul ji has given his consent to contest from two seats, very happy to inform you that he will also contest from Wayanad in Kerala. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/Rt7IDNxr0D
— ANI (@ANI) March 31, 2019
राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढवावी यासाठी एक महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच दक्षिण भारतातील केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी सध्या लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, २००४ पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. अमेठीतून राहुल यांच्यासमोर भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचे आव्हान असणार आहे.
लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ पासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या २००८ पासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे.
In addition to Amethi, UP, Congress President @RahulGandhi will also be contesting from Wayanad, Kerala, for the Lok Sabha 2019 elections.
— Congress (@INCIndia) March 31, 2019