दिल्ली : वृत्तसंस्था – एक्झिट पोलमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नैराश्याचे वातावरण निवळण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ट्विट करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
कांग्रेस पार्टी के प्रिय कार्यकर्ताओं ,
अगले 24 घंटे महत्वपूर्ण हैं। सतर्क और चौकन्ना रहें। डरे नहीं। आप सत्य के लिए लड़ रहे हैं । फर्जी एग्जिट पोल के दुष्प्रचार से निराश न हो। खुद पर और कांग्रेस पार्टी पर विश्वास रखें, आपकी मेहनत बेकार नहीं जाएगी।
जय हिन्द।
राहुल गांधी
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2019
आपल्याला आगामी २४ तास खूप महत्वाचे आहेत. एक्झिट पोलचे अंदाज ग्राहय धरू नका. सतर्क आणि दक्ष रहा,घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलला बळी पडू नका आणि त्यावर विश्वासही ठेवू नका. एक्झिट पॉल हे खोटे आहेत. असे ट्विट करून कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
स्वतःवर आणि पक्षावर विश्वास ठेवा तुमचे श्रम कदापि वाया जाणार नाहीत असा दिलासाही राहुल गांधी यांनी दिला आहे.
प्रियांका यांनीही अफवा आणि एक्झिट पोलवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं होतं. स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसण्याच्या सूचनाही प्रियांका यांनी कार्यकर्त्यांना केल्या होत्या.