सेना-भाजप सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार : राज ठाकरेंचा घणाघात

महाड : पोलीसनामा ऑनलाइन- भाजपा आणि शिवसेना हे दोघेही सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार पक्ष आहेत. ते जनतेचा विचार करत नाहीत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील. असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी हा आरोप केला.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर रायगड जिल्ह्यातील महाड येथे सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा – शिवसेना महायुतीवर निशाणा साधला. काही महिन्यांपूर्वी एकमेकांना शिव्याशाप देत असलेले शिवसेना आणि भाजपा हे योग्य वेळ येताच युती करणार हे आधीच ठरलेले होते. भाजपा आणि शिवसेना हे दोघेही सत्तेसाठी पैशांसाठी लाचार पक्ष आहेत. ते जनतेचा विचार करत नाहीत. असा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच पर्यटनाची क्षमता कोकणामध्ये मोठी आहे. केवळ पर्यटनावर केरळसारखे राज्य आपली अर्थव्यवस्था चालवत आहे. कोकणात केरळपेक्षा अधिक चांगले निसर्गसौंदर्य आहे. कोकणाची पर्यटनाची क्षमता इतकी अफाट आहे की इथले तीन जिल्हे आख्ख्या महाराष्ट्राची काळजी घेऊ शकते. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर येथे अनेक आमदार, खासदार झाले. मात्र त्यांनी विकासाच्या दृष्टीने काही केले नाही. असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, केवळ चांगले रस्ते झाले म्हणजे विकास नव्हे. असा टोलाही त्यांनी लगावला.

याचबरोबर, काहीजण नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर माझ्याकडे आले होते. त्यांनी पेढे दिले. असेही त्यांनी म्हंटले. परंतु याचबरोबर नाणारबाबत बेसावध राहू नका. यांचा काही भरवसा नाही. हा प्रकल्प निवडणुका झाल्यानंतर पुढे रेटण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.