शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून बघायचं हेच कळत नाही. शिवसेनेला स्वत: ची भूमिका राहिली नाही. ह्यांची पैश्याची कामं अडली की हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि कामं झाली की सत्तेत राहतात. शिवसेनेने ‘भारत बंद’वर टीका केली. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
[amazon_link asins=’B01951R2S2,B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’971f764d-b507-11e8-910f-2b8adbf62433′]

“महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलनं केली. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो. त्यांनी सतत असा जागता पहारा ठेवला पाहिजे.”, असे म्हणत राज ठाकरेंनी ‘भारत बंद’मध्ये सहभागी मनसैनिकांचे अभिनंदन केले.

“आज महाराष्ट्र सैनिकांवर ज्या पद्धतीची कलमं टाकली गेली, ती पाहून मला भारतीय जनता पक्षाला सांगावसं वाटतं की, आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या तुम्ही विरोधात असाल. याचा आम्ही समाचार घेऊच, पण भाजपच्या अंगलट हे येणार नक्की”, असा इशारा राज ठाकरेंनी भाजपला दिला.
[amazon_link asins=’B071W6FQPL,B01DU5OJCQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c4b50a5-b507-11e8-8d73-07c2d180f81f’]

“रविशंकर प्रसाद म्हणाले की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणं आमच्या हातात नाही. मग 2014 च्या आधी तुम्ही यासाठी का बंद पुकारला होतात? पेट्रोल डिझेलच्या भावाने उच्चांक गाठला आहे, रुपयाने निचांक गाठलाय आणि तरीही त्याची भाजपला लाज नाही वाटत. लोकांचा आक्रोश दिसून आलाय.”, असे राज ठाकरे म्हणाले.

“भारत बंद कोणत्या पक्षाने पुकारला होता हे महत्वाचं नाही. कारण पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ हा विषय महत्वाचा आहे आणि या दरवाढीमुळे महागाई सर्वत्र वाढली आहे आणि म्हणून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही बंदमध्ये सामील झालो.”, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली. तसेच, “नोटबंदी, जीएसटी फसली आणि त्यामुळे अर्थव्यवस्था गाळात गेली आणि ती बाहेर काढायला मोदी पेट्रोल-डिझेलवर वाट्टेल तेवढे कर लावत सुटलेत.” असा आरोप राज ठाकरेंनी मोदी सरकारवर केला.
[amazon_link asins=’B077RV8CCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a463ea5e-b507-11e8-8879-db86252205da’]

निवडणुका जिंकायच्या त्यातून पैसे कमवायचे आणि पुन्हा निवडणुका जिंकायच्या हाच भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, असाही गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा, असा टोलाही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा न्युज
पुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…
https://t.me/policenamanews