मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वत्र वाद निर्माण झालेला दिसत आहे. पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर एमआयएमला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट इशारा दिला आहे. ‘वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल,’ असं ट्वीट मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.
'आम्ही…' 'तुम्ही…' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण…. 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल!#मनसेदणका 👊 https://t.co/nuaQ2BuI9H
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 20, 2020
वारीस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते यांच्या वक्तव्याला पलटवार करताना मनसेनंही तितक्याच चिथावणीखोर पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण…. ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल, असं ट्वीट मनसेनं केलं आहे.