राजकोट येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ १८१ धावात संपुष्ठात आला. भारताने पहिल्या डावात केलल्या ६४९ धावांच्या डोंगरापुढे वेस्ट इंडिजला निम्मी धावसंख्या उभा करता आली नाही. भारताने विंडीजवर फॉलोऑन लादला आहे. त्यामुळे टीम इंडिया विंडीजचा दुसरा डावही आजच गुंडाळून विजय मिळवते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9de9ca6-c935-11e8-a311-a18dd8ccc3bf’]
विद्यार्थी नाही तर चक्क प्राध्यापकांनी केले कामबंद आंदोलन
त्याआधी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकाहून एक सरस खेळी केली . कर्णधार विराट कोहलीपाठोपाठ रवींद्र जाडेजानंही या कसोटीत शतक ठोकलं. विराटनं कसोटी क्रिकेटमधलं चोविसावं, तर जाडेजानं पहिलं शतक झळकावलं. त्यामुळं टीम इंडियाला नऊ बाद ६४९ धावांवर आपला पहिला डाव घोषित करता आला. या कसोटीत भारताच्या रिषभ पंतचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं.
[amazon_link asins=’B014R90AJA,B00L0X2M8E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a093e086-c937-11e8-bf7e-bd4e4309aa9b’]