आत्मबळ, जिद्द आणि चिकाटीमुळे यश प्राप्त होते : राजकुमार बडोले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अपयशामागे यश लपलेले असते, हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आत्मबळ, जिद्द व चिकीटीमुळे यश प्राप्त होते, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग-नागरी परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्य सेवा परीक्षा 2017 मधील बार्टीपुरस्कृत तसेच अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यशदा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अनुसूचित आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर यावेळी उपस्थित होते.

[amazon_link asins=’B06XSD5D99′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’583a2530-7c55-11e8-9c8a-09bec987ceb3′]

यावेळी राजकुमार बडोले म्हणाले, यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या सेवेकाळात शासन व प्रशासनात ताळमेळ ठेवून समाजाच्या विकासासाठी काम करावे. बार्टीतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. नागरी सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्णाचे प्रमाण वाढावे, यासाठी बार्टीतर्फे दोनशे विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथील नामांकित खाजगी कोचींग क्लासेसला प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.