कलम ३७० हटवल्यानंतर PM मोदी, HM शाहांचे ‘फॅन’ झाले ‘सुपरस्टार’ रजनीकांत, ‘ही’ तर ‘कृष्ण अर्जुना’ची जोडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुपरस्टार रजनीकांत यांची सिनेसृष्टी सोबत राजकारण आणि समाजकारणावरही लक्ष असत त्यामुळेच नुकत्याच झालेल्या चेन्नई मधील एका समारंभात रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं चांगलाच कौतुक केलं आहे. केंद्र सरकारने मोठ्या धाडसाने कश्मीर बाबतचा निर्णय घेतल्यामुळे सुपरस्टार रजनीकांत यांनी मोदी शहांच कौतुक केलं आहे.

जम्मू-कश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्यामुळे रजनीकांत यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले हा चांगला निर्णय आहे, अमित शाह यांनी मिशन कश्मीर पूर्ण केल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो ज्यापद्धतीने त्यांनी हे काम केलंय ते खूप कमालीचं आहे आणि ज्यापद्धतीने आपण संसदेत भाषण केलं ते जबरदस्त आहे सर, जबरदस्त अशा शब्दात रजनीकांत यांनी अमित शहांच कौतुक केलं.

पुढे रजनीकांत म्हणाले आता लोकांना अमित शाह यांची ताकद समजेल, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची जोडी कृष्ण आणि अर्जुनाच्या जोडीसारखी आहे. रजनीकांत एका पुस्तकाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. “Listening, Learning and Leading” असे त्या पुस्तकाचे नाव असून त्यात मागच्या दोन वर्षांमधील देशातील राष्ट्रपतींच्या ३३० योजनांची झलक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –