‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतनं सांगितलं स्वयंवर शोचं सत्य, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॉन्स्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत हिनं पुन्हा एकदा बिग बॉस 13 ची स्पर्धा शहनाज गिल आणि तिच्या विडलांबद्दल बिंधास्त वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच राखीनं शहनाजचे वडिल संतोख सिंह यांना म्हटलं होतं की, त्यांनी तिचं नाव आदरानं घ्यावं आणि त्यांनी या गैरसमजात राहू नये की, त्यांनी मुलगी कॅटरीना कैफ आहे. आता राखीनं एका मुलाखतीत रिअ‍ॅलिटी शोचं सत्य सांगितलं आहे. शहनाजबद्दलही ती बरंच काही बोलली आहे.

राखी सावंत म्हणाली, “माझं स्वयंवर तर नकलीच होतं. रिअ‍ॅलिटी शोलिटी शो खरे नसतात. मी शोमध्ये कधीच लग्न केलं नाही. तसंही टीव्हीवर लग्न करण्यासाठी चांगली मुलं नसतात. मला एखादा चांगला मुलगा मिळालाही नाही.”

https://www.instagram.com/p/Bqmp2TLn73c/

परंतु राखीला जेव्हा विचारलं की, तिचं लग्न झालं होतं परंतु ती तर वेगळी झाली होती. तेव्हा यावर बोलताना ती म्हणाली, “आम्ही फक्त एंगेजमेंट केली होती. तसंपण हे सर्वकाही जगाला दाखवण्यासाठी असतं. सत्य काही वेगळंच असतं. तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा. नाहीतर नका करू. सर्व तुमच्यावर असतं. चॅनल तुम्हाला कधीच फोर्स करत नाही. तेव्हा माझं आणि अभिषेकचं ब्रेकअप झालं होतं. माझ्यावर घरची जबाबदारी होती. काही चुकीचं करण्यापेक्षा स्वयंवर बरं म्हणून मी ते केलं. त्यानंतर मी मुंबईत घर घेतलं.”

जेव्हा राखीला विचारण्यात आलं की, शहनाजनं हा शो करून चूक केली आहे का. तेव्हा यावर बोलताना ती म्हणाली, शहनाजचे वडिल संतोख सिंह यांनी मला सांगितलं होतं की, त्यांच्या मुलीला 10 लाख रुपये ऑफर झाले आहेत. परंतु मी स्वयंवर केलं होतं तेव्हा मला दीड कोटी मिळाले होते.”