‘आजारी मुलांना आमच्या पायावर आणून ठेवायचे लोक’, ‘रामायण’ची ‘सीता’ दीपिकानं केला ‘खुलासा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेनं टीआरपीटचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. आजही ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. त्या काळी तर लोक यातील पात्रांना खरंच देव सजमत होते आणि त्यांची पूजाही करत होते. अभिनेत्री दीपिका चिखलिया हिला खरोखरंच लोक सीता समजायचे. दीपिकानं असा एक किस्सा शेअर केला आहे.

दीपिकानं सांगितलं की, “आम्हाला लोकांनी देवाच्या जागी नेऊन ठेवलं होतं. कुठेही कोणी भेटलं की ते पायाच पडायचे. वाढदिवस असेल किंवा कोणी मूल आजारी असेल तर त्यांना आमच्या पायाशी आणून ठेवायचे. लोकांना असंच वाटत होतं की, आम्ही राम आणि सीता आहोत आणि आमचा आशीर्वाद घेतल्यानं आयुष्यात खरंच काही बदल होईल.

दीपिका पुढे म्हणते, “आम्ही लोकांना खूप समजावलं. आम्ही सांगितलं की, आम्ही कलाकार आहोत आम्ही फक्त अभिनय केला आहे. आम्हाला तुम्हाला फसवायचं नाही. लोक खूप आदरानं बोलायचे. कायम बोलताना त्यांची नजर झुकलेली असायची. भेटायला येणं पाया पडणं हे तर सुरूच होतं.

90 च्या दशकात आलेल्या या मालिकेत अरुण गोविल यांनी राम आणि सुनील लहरी यांनी लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. या मालिकेला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं.