केवळ सुडापोटी फडणवीसांच्या चौकशीचा घाट, शिवसेनेच्या मंत्र्यांची देखील चौकशी करा : रामदास आठवले

मुंबई : पोलीननामा ऑनलाईन –   मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुडाचं राजकारण करू नये. महाविकास आघाडीने केवळ सुडापोटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याचा घाट घातला आहे. चौकशी करायचीच असेल तर मग त्यावेळी संबधित मंडळात असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

धार्मिक स्थळं सुरु करण्याची आमची मागणी आहे. आम्ही त्यासाठी आंदोलनही केले. शिवसेनेने कोणाच्याही दबावाला बळी पडू नये आणि त्यांनी सर्व धार्मिक स्थळं उघडावीत. आठवले म्हणाले, फिल्म इंडस्ट्री मुंबईचं सर्वात मोठं आकर्षण आहे. फिल्म इंडस्ट्री मुंबईतच राहायला हवी. तसेच ड्रग्स घेणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीत काम देऊ नये, अशी आमची मागणी आहे.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून 15 लाख रुपयांची मदत करावी,काँग्रेस सध्या कृषी विधेयकाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे राज्यातील पिकांच्या नुकसान भरपाईला तयार नाही.
आठवले म्हणाले की, अभिनेत्री कंगना रनौतला मुंबईत येण्यापासून पायबंद घातला, त्यामुळेच आम्ही तिला पाठिंबा दिला होता. मुंबईला बदनाम करण्याची ताकद कुणातच नाही.

जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फे-यात

फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही भाजपाच्या यशस्वी योजनांमधली एक समजली जात होती. पण आता तीच योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. जलयुक्त शिवारमध्ये ९ हजार कोटी वापरले होते. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशीही माहिती उघड झाली आहे. तसेच या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे.

जलयुक्त शिवाय योजना अपयशी

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळातील महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचे कॅगने म्हटले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गावं दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट हे सफल झाले नाही. या योजनेवर सुमारे 9 हजार 634 कोटी रुपये खर्चूनही पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचे कॅगने म्हटलं आहे. जलयुक्त शिवारची अनेक काम निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असा ठपका कॅगने ठेवला होता.