बॉलिवूड म्हणजे दुराचाराचा अड्डा : रामदेव बाबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादात आख्खे बॉलिवूड ढवळून  निघत असताना  आता योगगुरू रामदेब बाबा यांनी देखील या प्रकरणात  उडी घेतली आहे. ‘बॉलिवूड म्हणजे दुराचाराचा अड्डा आहे. त्यासाठी केवळ एका व्यक्तिला जबाबदार धरता येणार नाही. तर संपूर्ण समाज आणि देशाने सामूहिक जबाबदारी म्हणून देशाचं चारित्र्य घडवलं पाहिजे’, असं मत रामदेव बाबांनी व्यक्त केलं आहे.  बॉलिवूड संदर्भात केलेल्या त्यांच्या या वाक्यामुळे बॉलिवुडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7900494a-cb89-11e8-b5d2-7b4927568b04′]
योगगुरूकडून देशाला चारित्र्याचे धडे 
एका खाजगी टीव्ही वाहिनीशी बोलताना त्यांनी बॉलिवूड संदर्भात वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर  ‘घरापासून समाजापर्यंत सर्वांनीच ‘नॅशनल कॅरेक्टर बिल्डअप’ केलं पाहिजे. संपूर्ण जग आपल्यापासून हे शिकलं आहे. त्यामुळे आता सिनेमा आणि मालिकांमध्येही नैतिकतेचे मापदंड निर्माण करावेच लागतील’, असं त्यांनी स्पष्ट केलं. नाना-तनुश्री वादात कोण खरे आणि कोण खोटे आहे हे चौकशीतून निष्पन्न होईलच. मात्र जे काही चाललं आहे ते योग्य नाही. दुराचार सर्वत्रच आहे. बॉलिवूड, धर्मकारण आणि राजकारण सर्वत्र दुराचाराने पाय पसरले आहेत. मात्र बॉलिवूड हा दुराचाराचा अड्डा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राम मंदिर कधी बांधणार ? संघाला विचारा 
दरम्यान, राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर बोलण्यास रामदेव बाबांनी नकार दिला. मात्र राम मंदिर कधी बांधणार हे भाजप, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.
[amazon_link asins=’B07D5ZD12G,B01N54ZM9W,B077N7DDL1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’84cd3899-cb89-11e8-ad1e-cdf582a93a6f’]
महागाई वाढली, पायी चला 
यावेळी रामदेव बाबांनी महागाईवरून भाजपला कानपिचक्या दिल्या. ‘महागाई प्रचंड वाढलीय. त्यामुळे लोकांनी शक्यतो पायीच प्रवास करावा. पायी चालण्याची सवय लावून घ्यावी. जवळ जायचे असेल तर सायकलचा वापर करावा’, असं सांगतानाच गरिबांना सरकारवरच अवलंबून रहावं लागणार असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.